वाघाचे हल्यात शेतकरी जागीच ठार: परिसरात आतापर्यंत 9 जणांचा गेला बळी वाघाला जेरबंद करन्याची मागणी
चंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्रात खांबाडा नियत शॆत्रात काल 5 ऑक्टॉबर रोजी वाघाने हल्ला करून खांबाडा येथील मारोती पेंदोर यास जागीच ठार केल्याची घटना घडली वाघाच्या हल्लात आतापर्यंत 9 जणांचा बळी गेला असून आता या वाघाला ठार मारच अशी मागणी होत आहे.
मारोती पेंदोर याचे खांबाडा गावाला लागून जंगल शेजारी शेत आहे त्यामुळे पाळीव जनावराना चारण्यासाठी जंगलात गेला होता परंतु घरी परत आल्याने आज शोध घेतला असता जंगलात वाघाच्या हल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले वाघाने त्याचे 70 टक्के भाग खाल्याचे समजते विषेश म्हणजे वाघ हा माणसाला ठार करतो पण मास खात असल्याची अपवाद या नरभक्षक वाघात दिसून येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी पोहचले परंतु जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे आता कापूस वेचणीचा हंगाम सुरु होत आहे वाघाच्या दहशतीने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीची कामे कशी करायची या विवंचनेत शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
0 Comments