स्वयंसहायता समुहांची मुख्यमंत्री यांना 4 लाख पत्रे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या अभियानात खोडा ; जिह्यतून 60 हज़ार पोस्टकार्ड पाठवले जाणार: चंद्रपुर : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये तसेच चुकीचे आकलन करुन कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसुबा हानून पाडण्यासाठी राज्यभरातील स्वंयसहायता समुह सुमारे 4 लाख पोस्टकार्ड मुख्यामंत्री यांना पाठविणार आहे. केंद्रसरकारच्या दारिद्रय निर्मुलन धोरणा अंतर्गत राज्यात राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका कार्यक्रमाची (उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती...
0 Comments